Jagdish Patil
केंद्र सरकारने रस्ते आणि रेल्वे मार्गावर लक्ष केंद्रीत करत देशभरात रस्ते आणि रेल्वेचे जाळे पसरवले आहे.
मात्र, तरीही भारतात अद्याप अशी काही राज्य आहेत का की जिथे रेल्वे पोहोचलीच नाही?
सध्याच्या काळात, रेल्वे एखाद्या राज्यात पोहचली नाही हे ऐकायला देखील आश्चर्यकारक वाटू शकतं.
मात्र, भारतातील सिक्किम राज्यात अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही.
त्यामुळे भारतभर रेल्वेचे जाळे पसरलेले असले तरी सिक्किम राज्य रेल्वे सेवेपासून वंचित राहिलेलं आहे.
सिक्कीम मधील डोंगराळ प्रदेशामुळे रेल्वेचे काम आव्हानात्मक असल्याचं बोललं जातं.
परंतू आता रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने सिक्कीममध्ये देखील रेल्वे स्टेशनच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे.
सिक्कीममध्ये शिवोक-रंगपो येथे रेल्वेच्या कामाला सुरूवात केली असून येत्या काही वर्षात इथे पहिल्यांदाच रेल्वे धावण्याची शक्यता आहे.