Jagdish Patil
'कोशिश करने वालों की हार नहीं होती', असं म्हटलं जातं. या वाक्याला साजेसं उदाहरण म्हणजे IPS आकाश कुलहरी आहेत.
कारण कधीकाळी कमी गुण मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढलं होतं.
मात्र, जिद्दीच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करत यशाला गवसणी घातली.
आकाश यांनी कानपूर आणि प्रयागराजमध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केलं आहे.
राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आकाश यांची सक्सेस स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
आकाश यांनी सांगितलं की, 1996 मध्ये दहावीच्या परीक्षेत केवळ 57% गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढण्यात आलं होतं.
मला पुन्हा त्या शाळेत प्रवेश दिला नाही. पण मी हार मानली नाही आणि जिद्दीने अभ्यास करून स्वत:ला सिद्ध केलं, असं ते म्हणाले.
त्यांना बारावीत 85% मिळाले, त्यानंतर डूग्गल कॉलेजमधून बी.कॉम तर JNU तून M.com केलं. याचवेळी त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली आणि 2006 ला पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केली.