Roshan More
अपयश ही अपयशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात. पण एकदा दोनदा नव्हे तब्बल 33 वेळा आदित्य कुमार यांना अपयश आले.
आदित्य कुमार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पण ते सलग 33 परीक्षा नापास झाले.
आदित्य यांनी 12 झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली बँक AIEEE, KVS अशा तब्बल ३३ परीक्षा त्यांनी दिल्या. मात्र, यश मिळाले नाही.
आदित्य हे मुळचे राजस्थानचे त्यांनी UPSC ची तयारी करण्याचे निश्चित करून 2013 मध्ये दिल्ली गाठली.
दिल्लीतून येऊन UPSC ची तयारी केली मात्र 2014, 2015 आणि 2016 असे सलग तीन वेळा UPSC च्या परीक्षेत अपयश आले.
आदित्य यांनी अपयश येऊनही अभ्यास थांबवला नाही. शेवट त्यांच्या कष्टाचे चीज झाले अन् ते 2017 UPSC परीक्षा पास होत IPS अधिकारी झाले.
आदित्य यांनी आपल्या यशामागचे रहस्य सांगताना म्हटले की, प्रयत्न कधीच सोडू नका. धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता.