सरकारनामा ब्यूरो
अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा पास करत IPS होण्याचे आपलं स्वप्न पूर्ण करणारी साक्षी कुमारी यांची संघर्ष कथा प्रेरणादायी आहे.
साक्षी या बिहार मधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया गावातील रहिवासी आहेत.
साक्षी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांच शिक्षण मोहनिया गावात झाले. DAV स्कूलमधून त्यांनी 10वी पर्यतचं शिक्षण पूर्ण केले.
2011मध्ये त्या बनारसला गेल्या तेथे त्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर लखनऊला येथील रामस्वरूप कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
ग्रॅज्युएशननंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याच ठरवले. यामुळे त्या घरी न जाता दिल्लीला आल्या. दिल्लीत 10 वर्ष राहून त्यांनी परीक्षेची तयारी केली.
दोनदा UPSC ची परीक्षा दिली. मात्र त्यांना अपयश आले पण त्या माघार न घेता अभ्यास करत राहिल्या.
अपयश येऊनही न खचता त्यांनी पुन्हा 2021 मध्ये UPSC ची परीक्षा देत 330वा रँक मिळवला.
303 रँक मिळालेल्या साक्षी यांची निवड IPS साठी झाली.
साक्षी या बिहार केडरच्या IPS अधिकारी आहेत.