Jagdish Patil
झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झाले असून आंदोलकांनी आज थेट विधान भवनाच्या दिशेने मोर्चा काढला.
झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इतर सरकारी परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनाचा भाग म्हणून आज हजारो विद्यार्थ्यांनी विधान भवनाच्या दिशेने मोर्चा काढला आहे.
आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडल्याचे फोटो समोर आले आहेत.
यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला आणि सौम्य लाठीमारही केला.
दरम्यान, राज्य सरकारने आंदोलकांच्या ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
आंदोलकांनी मात्र त्यांनी मागणी केलेल्या १३ परीक्षांपैकी सरकार केवळ तीन परीक्षा रद्द करण्यास सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे.
JPSC-जेएसएससी सुधारणा मंचचे नेते रवींद्र पासवान यांनी ते CBI चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.