Jagdish Patil
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी (ता.05) देशातील 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली.
त्यानुसार तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या बाबतची माहिती जाणून घेऊया.
त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात.
2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. ते वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास खात्यांचेही मंत्रीही होते.
15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला.
1990 च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1996, 1998 आणि 1999 साली सालची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली.
2018 साली त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता येताच वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.
उपमुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
राजकारणासह त्यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात.