Rajanand More
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या माजी आमदार के. कविता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा असून ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ (TRS) हे नाव पक्षाला दिले आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
पक्षाच्या नावातूनच कविता यांनी थेट आपल्या वडिलांच्या राजकीय साम्राज्यालाच आव्हान दिले आहे. पक्षाच्या घोषणेवेळी त्यांनी तसे संकेतही दिले.
केसीआर यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती (BRS) असे आहे. कविता यांनी त्यातील भारत या शब्दाऐवजी तेलंगणा हा शब्द वापरून अस्मितेचा भावनिक डाव टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षस्थापनेवेळी कविता यांनी बीआरएस पुढील हजार वर्षे बदलू शकत नाही, अशी टीका केली. तसेच वडिलांवरही निशाणा साधला. काँग्रेस सरकारलाही धारेवर धरले.
कविता यांच्याकडून पक्षातील अंतर्गत धोरणांवर टीका केली होती. त्यातून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी के. कविता या काही महिने तुरुंगात होत्या. त्यावरूनही बीआरएसमध्ये कलह निर्माण झाला होता.
दिल्लीतील स्थानिक कोर्टाने या प्रकरणातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह के. कविता तसेच सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.