Deepak Kulkarni
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर आग्रही दावा केला होता.
त्यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते.
सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील करण्यात आले.
महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.
हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने आणि राणेंना उमेदवारी मिळाल्यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज भरताना किरण सामंत यांची उपस्थिती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.
आता रत्नागिरीत पुन्हा एकदा राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत.
यावर किरण सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, हे माझं कार्यालय आहे. तिथे मीच बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार,असं म्हटलं आहे.