Deepak Kulkarni
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे.
फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पण राज ठाकरेंची ही भूमिका न पटल्याने मनसेला पहिला धक्का कीर्तीकुमार शिंदे यांच्या रुपाने बसला.
कीर्ती कुमार शिंदे यांनी आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केला.
राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी परखड पोस्ट शेअर केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी आपल्या पोस्टमधून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
तसेच राज ठाकरे यांची त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.