प्रधानमंत्री पीक विमा योजना: कोण पात्र? कोणते कागदपत्र लागणार? जाणून घ्या डेडलाइन

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी!

पंतप्रधान पीक विमा योजना 2025 खरीप हंगामासाठी पीक विमा नोंदणी सुरू झाली आहे! या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Sarkarnama

योजना कधी सुरू झाली?

पंतप्रधान पीक विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू झाली. या योजनेचा
उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीवर शेतकऱ्यांचे संरक्षण करणे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Sarkarnama

कोण करु शकतो अर्ज?

अधिसूचित क्षेत्रातील सर्व शेतकरी मालक, भाडेकरू (पट्टेदार) किंवा बटाईदार शेतकरी अर्ज करु शकतात.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Sarkarnama

प्रीमियम किती भरावा लागतो?

खरीप हंगामासाठी फक्त 2% प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकार भरते.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

कोणते कागदपत्रे लागतील?

पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, जमीन नोंद प्रमाणपत्र किंवा भाडेकरार,
आधार / पॅन / ओळखपत्र, पत्ता पुरावा, पिकाची घोषणा.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

लाभ कधी मिळणार नाही?

अधिसूचित क्षेत्राबाहेर पिकवलेले पीक, कापणीनंतर झालेली हानी, आधीच मुआवजा घेतलेले नुकसान.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

कोणाला बंधनकारक?

अल्पमुदतीचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा विमा बँकेमार्फत अनिवार्य आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Sarkarnama

Next : 1 ऑगस्टपासून बदलणार 6 मोठे नियम; क्रेडिट कार्ड, UPI, LPGवर होणार मोठा परिणाम! 

येथे क्लिक करा