Mangesh Mahale
मोतीलाल नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदे पंडित होते.
त्यांचा जन्म ६ मे १८६१ रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेत्री येथे, पुढील शिक्षण कानपूर,अलाहाबाद येथे झाले.
बी. ए. ला असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि वकिलीची परीक्षा दिली (१८८३)
कानपूर
काही वर्षे कानपूरला उमेदवारी केल्यानंतर ते अलाहाबादला नंदलाल यांच्या हाताखाली वकिली करण्यासाठी आले.
सुरुवातीस त्यांनी वकिली व तत्संबंधित विषय यापलीकडे दुसर्या कशातही फारसे लक्ष दिले नाही.
त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होमरूल लीगच्या स्थापनेनंतर १९१७ मध्ये झाली.
अँनी बेझंट यांच्या बाजूने ते सरकारविरुद्ध उभे राहिले. अलाहाबाद होमरूल शाखेचे ते अध्यक्ष झाले.
जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी भारतीयांची अमानुष कत्तल केली. या हत्याकांडाच्या काँग्रेसनियुक्त चौकशी समितीचे ते सदस्य होते.