Rashmi Mane
1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीसाठी एक कठीण परीक्षा होती. पण याच काळात अनेक करारी, लोकशाहीप्रेमी नेते उदयास आले आणि देशाच्या राजकारणाला नवसंजीवनी दिली.
या संघर्षमय काळात तयार झालेली ही पिढी केवळ आंदोलक नव्हती, तर पुढे जाऊन त्यांनी देशाच्या निती-निर्मितीत मोलाची भूमिका बजावली.
या नेत्यांचा त्याग, संघर्ष आणि लोकशाहीवरील निष्ठा यामुळेच आपण आज मुक्तपणे विचार मांडू शकतो. त्यांच्या आठवणी म्हणजे लोकशाहीचा अमूल्य ठेवा!
आणीबाणीच्या घोषणा होताच त्यांनी सरकारविरोधी आंदोलनात उडी घेतली. तुरुंगवासानंतर ते संघटनेचे प्रमुख विचारवंत झाले. त्यांची बौद्धिक स्पष्टता व दृढ भूमिका आजही आदर्श ठरते.
मुंबईतील झोपडपट्टीतून उठलेला नेता, ज्याने कामगारांचा आवाज दिला. आणीबाणीमध्ये अटक, भूमिगत चळवळ आणि नंतर देशाचे संरक्षणमंत्री होते.
बिहारमधील बख्तियारपूरमध्ये जन्मलेले नितीश कुमार जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सामील झाले. तुरुंगवास पत्करला आणि पुढे बिहारचे यशस्वी मुख्यमंत्री झाले.
पहिल्यांदा अटक झालेल्यांपैकी एक. तुरुंगात असतानाही ते लोकशाहीचे रक्षण करत राहिले. नंतर भारताचे पंतप्रधान झाले आणि आपल्या वक्तृत्वाने देशभरात आदर कमावला.
अस्सल मराठमोळे पण बिहारमधून चार वेळा लोकसभेत निवडून गेले. आणीबाणीच्या काळात विविध तुरुंगात ठेवले गेले तरी न डगमगता त्यांनी लोकशाहीची मशाल पेटती ठेवली.