Rajanand More
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध. ‘न्याय पत्र’ असे नाव.
महिला, युवा, कामगार, भागीदारी आणि शेतकरी या पाच मुख्य मुद्द्यांच्या अनुषंगाने या घटकांना 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत.
शेतमालाला किमान आधारभूत किमतीचा कायदा, तसेच कर्जमाफी आयोग स्थापन करण्याचे अन् जीएसटीमुक्त शेतीचे आश्वासन.
एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षणाची 50 टक्केंची मर्यादा वाढवण्यात येईल. तसेच जातनिहाय जनगणना केली जाईल.
महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल. गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये.
युवकांसाठी 30 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे काँग्रेसचे आश्वासन. एक वर्षाच्या आत रिक्त पदे भरणार.
सरकारी कार्यालयांतील कंत्राटी पद्धत बंद केली जाणार. कामगारांना किमान मजुरी निश्चित करण्याचे आश्वासन.
ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग पेन्शन वाढवून एक हजार रुपये प्रतिमहिना. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना 10 टक्के आरक्षण.
R