Akshay Sabale
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आले.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळेल अशी परिस्थिती आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानात महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे, असे मी खात्रीने सांगू शकतो.
एवढा कडक उन्हाळा असून देखील कार्यकर्ते मतदारांना केंद्रापर्यंत आणत असल्याचे मी पाहिले.
उन्हामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मात्र, आता पुढील टप्प्यांमध्ये मतांचा टक्का वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मी राज्यात सर्व ठिकाणी फिरत आहे. कोल्हापूरमध्ये आणि हातकणंगले मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 'दिल से' कामाला लागले असल्याचे दिसून आले.
राज ठाकरे मोकळ्या मनाचे व्यक्ती आहेत. जे मनात आहे तेच बोलतात. पोटात एक आणि ओठात एक असे त्यांना जमत नाही.
त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीचा प्रचार करायचा निर्णय घेतला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.