Akshay Sabale
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर आणि हिंगोलीतील शिवसेनेचे ( शिंदे गट उमेदवारी ) बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.
या सभेतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 'इंडिया' आघाडीवरही पंतप्रधान मोदी बरसले. पंतप्रधानांच्या सभेतील काही मुद्दे जाणून घेऊया...
देशासाठी सीमेवर ज्या पद्धतीने जवान कशाचीही तमा न बाळगता तैनात असतो. तसंच देशाच्या लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.
तुम्ही 'एनडीए'च्या बाजूने एकतर्फा मतदान करून आपला विजय निश्चित करत आहात, त्याबद्दल आभार. पण, जे लोक मतदान करत नाहीत, ते योग्य नाही.
विरोधकांनी निराश होऊ नये, आज नाही तर उद्या, कधी ना कधी तुम्हाला संधी मिळेलच. हिंमत हारू नका. भारताच्या मतदानाचा जगावर प्रभाव होतो.
आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'इंडिया' आघाडीचे नेते काम करत आहेत. देश कोणाच्या हातात सोपवायचा हेच ते ठरवू शकलेले नाहीत.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही.
4 जूननंतर 'इंडिया' आघाडी शतप्रतिशत एकमेकांचे कपडे फाडून, केस ओढतील. त्यांच्यावर मत वाया घालवू नका. आम्ही गरिबांसाठी काम केले तर त्याची थट्टा काँग्रेसकडून केली जाते.
काँग्रेसमुळे मराठवाड्याचा विकास रखडला, तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागतं आहे.
राम मंदिर उभे राहिले, पण 'इंडिया' आघाडीचे लोक सनातन धर्माला शिव्या देत आहेत, राम मंदिर, आमच्या भावनांचा अपमान करत आहेत.
R