Akshay Sabale
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. देशातील 21 राज्यांतील 102 जागांसाठी 1,625 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.
1,625 पैकी 252 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार तामिळनाडूतील असल्याचं समोर आलं आहे.
तामिळनाडू -
तामिळनाडूतील 138 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 81 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील उमेदवार आहेत. तेथील 28 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, 23 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
तिसऱ्या क्रमांकांवर असलेल्या मध्य प्रदेशातील 17 उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील 9 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्रातील 15 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
राजस्थानमधील 11 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, 7 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
R
NEXT : मोदींचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा अन् मनसेच्या मागण्या; राज ठाकरे काय म्हणाले?