Deepak Kulkarni
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले.
तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.
राज्यातील बारामती, सातारा, सांगली, धाराशिव, माढा, सोलापूर यांसह एकूण 11 लोकसभा मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
सर्वाधिक मतदान कोल्हापुरात 70.35 टक्के मतदान झालं असून सर्वाधिक कमी मतदान हे बारामतीमध्ये 56.07 इतकं झालं आहे.
गेल्या 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे.
या निवडणुकीत कमी झालेली मतांची टक्केवारी महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभेच्या 11 लोकसभेच्या मतदारसंघात उदयनराजे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदेसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे.
या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.