Sachin Waghmare
लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या एनडीए आघाडीने व काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे.
भाजपकडून मोठ्या धक्कातंत्राचा वापर केला जात असून तीन वेळा खासदार असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापले आहे.
राज्यातील उमेदवारांची निवड करून ही सहा जणांची समिती नावांची छाननी करून केंद्रीय समितीकडे पाठविणार आहे.
या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील असणार आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काम पाहणार आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील देखील सोबतीला असणार आहेत.
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जबाबदरे असणार आहे.
आमदार आशिष शेलार यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे.