Roshan More
केंद्र सरकारने गॅस बुकिंगचे नियम बदल केला असल्याचे सोशल मीडियातून सांगितले जात आहे.
त्यानुसार एका सिलेंडरनंतर दुसरं सिलेंडर मिळण्यासाठी ग्राहकांना ठराविक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 2 सिलेंडरमध्ये 45 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल.
तर उज्ज्वल योजनेचा लाभ न घेणाऱ्या शहरातील सामान्य ग्राहकांसाठी हे अंतर 35 दिवसांचे अंतर गॅस बुकींगसाठी निश्चित केले आहे.
केंद्र सरकारने निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, ही 35 दिवसानंतर बुकींग होणार की अफवा आहे. शहरी भागात 25 दिवसात तर, उज्वल योजनेसाठी 45 दिवसांत बुकींग होणार आहे.
याआधी सरकारने 25 दिवसांचा कालवधी निश्चित केला होता. मात्र, आता तो वाढवल्याची अफवा होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
गॅस घेताना ग्राहकांसाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. नोंदणी असलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतरच सिलेंडर दिला जाणार आहे.