Akshay Sabale
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागसवर्गीय अशा सर्व घटकांना न्याय देणार अर्थसंकल्प सादर केला. त्यातील काही मुद्दे जाणून घेऊया.
अन्नपुर्णा मुख्यमंत्री योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिला आणि तरूणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रूपये वाटप करण्यात येणार आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचे अनुदान 10,000 रूपयांवरून आता 25,000 रूपये करण्यात आले आहे.
राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलं आहे.
8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्ब घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पेट्रोलचे दर 65 पैसे आणि डिझेलचे दर 2 रूपये 7 पैशाने कमी होतील.
युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रूपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.