Aslam Shanedivan
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने वीज दरात मोठी कपात करणारा निर्णय घेतला असून १ एफ्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत.
नवीन वीज दरानुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमधील दरामध्ये कपात करण्यात आली आहे.
महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात केली असून १० ते १४ टक्क्यांनी वीज दर कमी होणार आहे.
वीज दरामध्ये कपात केल्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार असून परिणामी खिशावरील ताण कमी होणार आहे
वीज दर कपातीच्या निर्णयानुसार, ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठी ९.७ टक्के कपात करण्यात आली असून आता ४.७६ रुपयांऐवजी ४.३० रुपये द्यावे लागतील
१०१ ते ३०० युनीटसाठी (१०.८ टक्के कपात) ७.१० रुपये मोजावे लागतील. तर ३०१ ते ५०० युनीटसाठी १४ टक्के कपात प्रमाणे आता ११.६४ रुपये मोजावे लागतील.
तर ५०० पेक्षा अधिक युनीटमध्ये १३.१ टक्के कपात करण्यात आली असून १४.५५ रुपयांऐवजी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत.
PAN, ITR Update : 1 एप्रिलपासून आयकर, PAN, ITR काय बदल होणार? जाणून घ्या!