मुख्यमंत्री कार्यालयाचे शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन, 15 जूनपर्यंत घ्या 'या' दोन गोष्टींची काळजी

Ganesh Sonawane

आवाहन

मुख्यमंत्री कार्यालयाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

devendra fadnavis.jpg | sarkarnama

पावसाची शक्यता कमी

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे, असे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

Maharashtra Farmers Monsoon Update

पेरणीची घाई नको

आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. असे आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केले आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

मान्सून

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Monsoon | Sarkarnama

जोर कमी

मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे.

Farmer | Sarkarnama

घाईघाईत पेरणी नका करु

त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याने पेरणीची घाई करु नये.

Farmer | Sarkarnama

वादळी पाऊस

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Farmer | Sarkarnama

पेरणीस पोषक पाऊसाची शक्यता कमी

तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

तापमान उच्च

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Farmers Monsoon Update | Sarkarnama

काळजी घ्या..

विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

Farmer | Sarkarnama

NEXT : CM फडणवीसांचं मराठा समाजाला मोठ गिफ्ट, ओबीसींप्रमाणेच सर्व सवलती, 8 नव्या योजना समजून घ्या!

Devendra Fadnavis | Sarkarnama
येथे क्लिक करा