Aslam Shanedivan
राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीतने शेतकऱ्यांसह पशुपालकांचे मोठे नुकसान झाले होते
दुधाळ जनावरे मृत किंवा बेपत्ता झाली होती. तर कुक्कुटपक्षांचेही नुकसान झाले होते. यामुळे अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
पण आता फडणवीस सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3 हजार रुपये मिळणार असून मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार 500 रुपये जाहीर.
ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32 हजार रुपये मिळणार. तर मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी 20 हजार रुपयांची घोषणा.
प्रति शेळी आणि मेंढीसाठी 4 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार आहेत.