Farmers Compensation : सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई

Aslam Shanedivan

शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे

Farmers Compensation | Sarkarnama

राज्य सरकार

मार्च- एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या नुकसानीसाठी ३३४ कोटी ९८ लाख रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत.

Farmers Compensation | Sarkarnama

आंबा आणि काजू

त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असून विशेषतः कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Farmers Compensation | Sarkarnama

'अल निनो'

दरम्यान, 'अल निनो'च्या प्रभावामुळे यंदा राज्यात तुटीच्या पावसाचा अंदाज असून, संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.

El Nino | Sarkarnama

बँक खात्यांवर जमा

दरम्यान राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तब्बल साडेसोळा हजार कोटी रुपयांची मदत बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे.

Farmers Compensation | Sarkarnama

मदतीला मान्यता

मदत व पुनर्वसन विभागाकडे पंचनामे आणि प्रस्ताव विभागाकडे सादर झाल्यानंतर एकाच दिवसात या मदतीला मान्यता दिली गेलीय.

Farmers Compensation | Sarkarnama

जुनी मदतही

तसेच, 'महायुती सरकार येण्यापूर्वीची जुनी प्रलंबित असणारी सुमारे ५,००० कोटी रुपयांची मदतही या सरकारने शेतकऱ्यांना दिल्याचे मकरंद पाटील यांनी म्हटले आहे

Farmers Compensation | Sarkarnama

चार वेळा आमदार! आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा, आता शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज, कोण आहेत सचिन अहिर?

आणखी पाहा