farmer's relief : दिलासादायक! अतिवृष्टीभागातील 'या' 6 जिल्ह्यांना मिळणार अतिरिक्त मदत, सुधारित पंचनामेही पूर्ण

Aslam Shanedivan

मराठवाडा आणि विदर्भ

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे तब्बल 68 लाख 13 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 83 लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

राज्य सरकारची मदत

राज्य सरकारने मदत म्हणून 3,258 कोटी रुपये मंजूर केले असून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी 480 कोटी 37 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत

Mahayuti Sarkar | Sarkarnama

केंद्र सरकारची मदत

याच दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने देखील मदतीचा हात दिला असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत ₹1566.40 कोटींची मदत मंजूर केली आहे.

Amit Shah | sarkarnama

Maharashtra Farmers Get Relief34 जिल्ह्यांतील पंचनामे

अशातच आता राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे झाले असून याचा अहवाल महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागांनी 17 दिवसांत पूर्ण केले आहेत.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

सहा जिल्ह्यांसाठी विशेष मदत

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वीच पंचनामे पूर्ण केले होते.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

हेक्टरची मर्यादा वाढली

या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली आहे.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

7 लाख हेक्टर क्षेत्र वाढले

या निर्णयामुळे या सहा जिल्ह्यांतील सुमारे 7 लाख हेक्टर क्षेत्र अतिरिक्त नुकसानग्रस्त क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे नुकसानाची एकूण आकडेवारी 68 लाख 13 हजार 242 हेक्टर झाली आहे.

Maharashtra Farmers Get Relief | Sarkarnama

Maharashtra Government : राज्यभरातील शाळांसाठी मोठी अपडेट! ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’चा तिसरा टप्पा सुरू, मिळणार करोडो रुपयांची बक्षिसे!

आणखी पाहा