Aslam Shanedivan
मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणे या उदात्त हेतूने महाराष्ट्र सरकार योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली असून या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी आर्थिक मदत देते.
योजनेअंतर्गत दोन मुलींनंतर पालकांनी कुटुंब कल्याण नसबंदी केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले जातात.
तसेच मुलीच्या व आईच्या नावाने बँक खाते उघडून विमा संरक्षण आणि इतर सुविधा या योजनेत उपलब्ध आहेत.
राज्य सरकारने एप्रिल २०१६ मध्ये ही योजना सुरू करत गरजू कुटुंबांतील मुलींचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ते ७.५०/८ लाखांपर्यंत असावे.
पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीनंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे. एका मुलीच्या नावावर ५०,००० रुपये आणि दोन मुली असल्यास प्रत्येकी २५,००० रुपयांची मुदत ठेव (FD) केली जाते.
अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, मोबाईल क्रमांक आणि मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते.