Rashmi Mane
मे सुरू होण्याआधीच विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. तापमान झपाट्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये उकाड्याची तीव्रता जाणवते. नागरिक हैराण झाले आहेत.
मंगळवारी तापमानाने 44°C चा टप्पा ओलांडला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाचा सर्वाधिक तापमानाचा विक्रम नोंदवला गेला.
हवामान विभागानुसार तापमान सरासरीपेक्षा 1.3 ते 3.8°C जास्त आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक धोकादायक बनत असल्याचे संकेत आहेत.
अकोल्यात तब्बल 44°C तापमान नोंदले गेले. त्यामुळे हे शहर मंगळवारी जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले आणि सर्वांचे लक्ष वेधले.
अमरावतीत 43.8°C तर वर्ध्यात 43.5°C तापमान नोंदले गेले. ही शहरे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अग्रस्थानी राहिली.
देशातील 20 सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये विदर्भातील 9 शहरांचा समावेश झाला. यावरून उष्णतेची तीव्रता स्पष्ट होते.
नागपूरमध्ये 42.2°C तापमान होते. चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही 42°C पेक्षा जास्त तापमान नोंदले गेले.
रात्रीचे तापमानही जास्तच आहे. चंद्रपूरमध्ये 27.6°C किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे नागरिकांना आराम मिळत नाही.