Land Partition: तुमच्या खिशात 100 रुपये आहेत, तर जमीन वाटणीचा मोठा प्रॉब्लेम मार्गी लागू शकतो; 'असा' कराल अर्ज

Deepak Kulkarni

धडाकेबाज निर्णय

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागानं एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. या निर्णयांमुळे गावा-गावांमधील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळत आहे.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

सहज सोपी पद्धत

जमीन वाटणी संदर्भात अर्जदारास तहसिलदारांकडे अर्ज वा वैयक्तिक पातळीवर वाटणीपत्र तयार करून त्याची केवळ 100 रुपयांत नोंद करता येणार आहे.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

मोठा मनस्ता

वर्षानुवर्षे अनेक कुटुंबात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीच्या मुद्द्यावरुन कौटुंबिक वाद, कर्ज मिळण्यास अडचण, खरेदी-विक्रीस अडथळा, सरकारी योजनांचा वंचित राहण्याचा धोका यांसारखा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. 

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

100 रुपयांच्या शुल्क

फडणवीस सरकारच्या नव्या आदेशानुसार, आता वडिलोपार्जित शेतजमिनीच्या कुटुंबातील सदस्यांचं वाटणीपत्र आता केवळ 100 रुपयांच्या शुल्कात नोंदवता येणार आहे.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

कुटुंबातील सदस्यांची परवानगी

तहसिलदार कार्यालयात किंवा तलाठ्याकडे जमीन वाटणीसाठी अर्ज दाखल करण्यात येतो. वारसाहक्काशी संबंधित कुटुंबातील सदस्यांची परवानगी असेल तर,100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वाटपपत्र करून महसूल विभागात अर्ज दाखल केला जातो.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

कागदपत्रं

वाटणीपत्रासाठी संबंधित जमिनीच्या सातबारा, वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, 8-अ, जागेचा नकाशा मूळ सर्व कागदपत्रं आवश्यक असतात.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

प्रचंड वेळकाढूपणा

आतापर्यंत नागरिकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर संपत्ती नावावर अनेक अडथळे पार करावे लागत होते. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारी प्रोसेसची पूर्तता आणि स्टॅम्प ड्युटीमुळे प्रचंड वेळकाढूपणा केला जात होता.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

नोटिशीद्वारे खात्री

कुटुंबातील सर्व सदस्यांची संमती असल्याची तहसीलदाराकडून एका नोटिशीद्वारे खात्री करण्यात येईल.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

तलाठ्यावरच जबाबदारी

यानंतर तहसीलदाराकडून तत्काळ जमीन वाटपाचा आदेश काढण्यात येईल. तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तलाठ्यावरच राहणार आहे.

Maharashtra Land Partition 100 Rupees Farmer Scheme | Sarkarnama

NEXT: 'एल-निनोचा प्रभाव, पाणी टंचाईची शक्यता'; फडणवीसांच्या काटेकोरपणाच्या सूचना...

Maharashtra-Water-Crisis.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...