Sachin Waghmare
रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचार सभेप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.
विरोधातील नेत्यांवर आधी भ्रष्टाचारांचे आरोप करायचे. त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा.
भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना सोबत घ्यायचे, असेच काही दिवसांपासून राज्यात दिसत आहे.
मोदींचा आत्मविश्वास पहिल्यासारखा दिसत नाही. 2014 मध्ये फसलो होतो. आता मात्र तसे राहिले नाही.
'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी,' अशी पंतप्रधान मोदींची खिल्ली ठाकरेंनी उडवली.
सध्या कोणता नेता कुणीकडे आहे, हे समजत नसल्याचेही सांगत ठाकरेंनी राज्यात आयपीएल म्हणजेच 'इंडियन पॉलिटिकल लिग' सुरू असल्याचे म्हटले.
काल एका पक्षात असलेला नेता आज दुसऱ्या पक्षात असल्याने लोक संभ्रामात आहेत.
भाजपने राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे.
अखंड शिवसेना फोडून शिंदेंच्या हातात धनुष्यबाण दिला. आता त्यांचे उमेदवार दिल्लीतून कापले जात आहेत.
यंदा कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचा डाव टाकला. दिल्लीतील हा डाव मुख्यमंत्री शिंदेंच्या लक्षातच येत नाही.