Rajanand More
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. सध्या त्यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे ठाकले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या पक्षाचा दारुण पराभव करत भाजपने राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे.
पराभवानंतर पक्षातील आमदार-खासदारांनी बंड केले आहे. पक्षात उभी फूट पडली असून पक्ष आणि चिन्हही त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ममतादीदींच्या राजकीय प्रवासातील पाच महत्वाचे टप्पे पाहूयात.
ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी दशेपासून सुरू झाला. काँग्रेसमधून १९७०-८० च्या दशकात त्यांनी राजकारणात पाय रोवण्यास सुरूवात केली.
१९८४ मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर त्यांनी संसद गाजविण्यास सुरूवात केली.
ममतांनी १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता.
२०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव करत तृणमूलने बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. त्यानंतर सलग १५ वर्षे ममतादीदी मुख्यमंत्री होत्या.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलचा पराभव केला. ममतादीदीही पराभूत झाल्या. सत्ता जाताच पक्षात फूट पडली. हा ममतांसाठी आतापर्यंत सर्वात मोठा धक्का ठरला.