Jagdish Patil
CJP संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मिश्रा यांनी CJI सूर्यकांत यांचा विरोध करणाऱ्या 2026 बॅचच्या विद्यार्थ्यांना देशभरात वकिली करण्यासाठी नोंदणी न करण्याचा आदेश दिला होता.
हा आदेश वादात सापडल्यानंतर तो मागे घेण्यात आला आहे. मात्र, यावरून CJP ने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मनन कुमार मिश्रा हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील असून ते सध्या भाजपचे राज्यसभा खासदार आणि BCI चे अध्यक्ष आहेत.
त्यांनी पटना विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतलंय, तर छपरातील राजेंद्र महाविद्यालयातून त्यांनी बीएससी ऑनर्स केलं आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोपालगंज दिवाणी न्यायालयात वकिली केली. त्यांच्याकडे सुमारे 14 कोटींहून अधिकची मालमत्ता आहे.
1982 मध्ये मिश्रा यांनी पटना उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केलं.
ते दीर्घकाळापासून BCI अध्यक्ष राहिले असून 2025 मध्ये सलग सातव्यांदा त्यांची निवड झाली.
2010 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बैकुंठपूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
2024 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून त्यांनी बिनविरोध विजय मिळवला.