Roshan More
मनोज जरांगे पाटील यांनी आपला मुंबईला जाण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. कोणत्या मार्गाने जाणार हे देखील त्यांनी जाहीर केले आहेय
आंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर मोर्चाचा 15 सप्टेंबरला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे.
मोर्चाचा दुसरा मुक्काम 16 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्हातील श्रीगोंदा येथे असणार आहे.
तिसरा मुक्काम हा 17 सप्टेंबरला पुणे शहरातील हडपसरमध्ये असणार आहे.
चौथा मुक्काम 18 सप्टेंबर रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये असणार आहे.
19 सप्टेंबरला पाचव्या दिवशी आझाद मैदानावर सकाळी पाच वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, समाजाच्या ताकदीवर ते मुंबईतून विजयी होऊन परतील.