Pradeep Pendhare
मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजीपासून अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहणार असून, तीन कोटींपेक्षा जास्त आंदोलक सहभागी होणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या समोर ठेवल्या आहेत.
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे रोजीच्या आता कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आहे.
सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा अन् 1994 च्या धर्तीवरच GR काढावा.
मराठा आंदोलकांवरील महाराष्ट्र भरातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्यावेत.
आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढावा.
सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा आणि महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्यावी आणि मराठा उपसमिती बरखास्त करावी.
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करण्याबरोबरच शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.