Jagdish Patil
मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंत्रालयात सुरक्षाव्यवस्थेत बदल केला जाणार आहे.
मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतील बदलांबाबत CM देवेंद्र फडणवीसांनी एक बैठक घेतली. यावेळी सुरक्षा त्यांनी भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर FRS यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तर ही यंत्रणा नेमकी कशी काम करणार आहे ते जाणून घेऊया.
मंत्रालयात कोणाला प्रवेश करायचा असेल तर अभ्यंगताना ऑनलाईन पास स्वत: काढता येणार आहेत.
मेन गेटवरून आत गेल्यानंतर इमारतीमध्ये प्रवेश करताना स्कॅन केल्याशिवाय मुख्य इमारतीत प्रवेश मिळणार नाही.
अभ्यंगताना ज्या विभागात कामासाठी आले आहेत तिथून ते दुसरीकडे गेले तर पोलिसांची त्यांच्यावर नजर राहणार आहे.
मंत्रालयात येऊन कोणी आत्महत्या करण्याचा किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी तसंच ब्लॅक लिस्टमध्ये नाव टाकलं जाणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे पास घेण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर तासन् तास उभे राहावं लागणार नाही. सर्व सचिव अधिकारी मंत्री यांनाही फेस ID तयार केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे.