सरकारनामा ब्यूरो
भारतात सगळ्या प्रकारच्या गाड्यांना टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर थांबून पैसे भरत बसण्याची आवश्यकता लागत नाही.
FASTag म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. यामुळे वाहनचालकाला कोणत्याही अडथळ्याशिवाय पैसे आपोआप अंकाउटमधून भरले जातात.
काही वेळेला FASTag मध्ये तांत्रिक समस्येमुळे पैसे कट होतात, तर आता काळजी करायची गरज नाही फक्त या टिप्स केल्याने तुम्हाच्या खात्यामध्ये पैसे परत मिळणार आहेत.
FASTag वॉलेटमधून काही वेळा चुकीच्या व्यवहार होऊन टोल कट झाल्यास वाहनचालक यांची तक्रार थेट Indian Highways Management Company Limited (IHMCL) कडे तक्रार करू शकतो.
त्यांचा ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल किंवा ईमेल करून तुम्हाला यांची तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही NHAI (National Highways Authority of India) च्या वेबसाइटवर किंवा FASTagच्या पोर्टलला भेट देऊन पैसे परताव्याची विनंती करू शकता.
तुम्ही मोबाइल अॅपद्वारे ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता जे अनेकवेळा बँका आणि एजन्सी FASTag ला प्रदान करतात.
यामध्ये तुमचा व्यवहार झालेला तपशील, वाहन क्रमांक आणि कट झालेली रक्कमेची माहिती दिल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे परत येतील.