Jagdish Patil
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला.
या वचननाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठमोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. ती जाणून घेऊया.
वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी 20 ते 35 लाख घरांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मुंबईला पाणी पुरवठा वाढवण्यासाठी पुढील 5 वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार.
पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत 17 हजार कोटी रुपये, BMC मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार.
बेस्टमध्ये 2029 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस, महिलांना 50 टक्के सवलतीसह बसेसची संख्या 5 वरुन 10 हजारांवर नेणार.
लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणाही केली आहे.
रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करण्याचा मोठा वादा महायुतीने केला आहे.
पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना आणि मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करण्याचं आश्वासन वचननाम्यात दिलं आहे.