Rajanand More
यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी लोकापर्ण करण्यात आले. त्याच दिवशी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास वेगवान झाला आहे. प्रवासातील २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचत असून इंधन बचतही होत आहे.
वाहतुकीसाठी मार्ग खुला करताच काही वाहनचालक सेल्फी/फोटो काढण्यासाठी केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत आहेत.
द्रुतगती मार्गावर वाहन थांबवण्यास परवानगी नाही; त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
बोगद्यात वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून हलक्या वाहनांसाठी ती 100 किमी/ताशी तर बस/प्रवासी वाहनांसाठी 80 किमी/ताशी एवढी आहे.
संपूर्ण मार्गावर (बोगदे व पूल) 24x7 CCTV देखरेख ठेवण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही संपूर्ण मार्गावर असणार आहे.
सेल्फी/फोटोसाठी वाहन थांबवल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.