Ganesh Sonawane
विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी व पाणी कमतरतेमुळे आजार जडू नये यासाठी नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये 'वॉटर बेल' उपक्रम राबविला जाणार आहे.
दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजविणे शाळांना बंधनकारक केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांनी दिली.
नाशिकमध्ये उन्हाचा पारा ३८ अंशापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे - उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे शरीरात आवश्यक तेवढे पाणी असणे गरजेचे असते.
पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्यातून मुतखडा यासारखे आजार बळावतात.
विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना देखील पाणी पिण्याची गरज असते.
नियमितपणे पाणी सेवन शरीराला पोषक असते. मात्र, विद्यार्थ्यांकडून त्यात सातत्य राखले जात नाही.
त्यामुळे शालेय वेळेत दिवसातून तीन वेळा बेल वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी आठवण करून दिली जाणार आहे.
यासाठी 'वॉटर बेल' उपक्रम राबविला जाणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढेचं पाणी पिण्याची सूचना केली जाणार आहे