Pradeep Pendhare
नक्षलींना राज्य पोलिस दलांकडून 2008 पासून जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली होती.
नक्षलवादविरोधी अभियानाचे महानिरीक्षक संदीप पाटील यांना नक्षल्यांच्याविरोधात 'चक्रव्यूह' पद्धत अवलंबण्यात यश आले.
नक्षली नेता अभय याने माघार घेत चर्चेची तयारी दाखवल्यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी, 'शरण या आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हा', असे खडसावलं आहे.
'चक्रव्यूहा'चा पहिला हादरा 22 एप्रिल 2018 मध्ये बोरिया कसनासूर इथं देत पोलिसांच्या जोरदार प्रत्युत्तरात 34 नक्षली ठार झाले.
2021 मधील 21 मे रोजी 13, तर 13 नोव्हेंबरमध्ये 27 आणि जुलै 2024 मध्ये 12 नक्षली ठार झाले. पुढे चार वर्षांत 120 नक्षली मारले गेले.
गडचिरोलीत एकेकाळी संपूर्ण नक्षलींची दहशत होती, ती आता संपुष्टात आली असून, अनेक भागात मॅकवेलपद्धतीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
गडचिरोलीत नक्षलींचे चार दलम असून, 11 संपुष्टात आले आहेत. केंद्रीय समिती सदस्य ते कमांडरपर्यंत 49 नक्षली मारले गेले आहेत.
गडचिरोलीत टप्प्याटप्प्यानं 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून 10 हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे.
रोजगार वाढत असल्याने नक्षली चळवळीतील अनेकांनी आत्मसमर्पण केलं असून, काही नक्षलींनी कंपनीत काम देखील सुरू केलं आहे.