Mangesh Mahale
तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी NCPI पक्षात विलीनीकरणाची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणूक न लढवलेला पक्ष अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी कसा पोहोचला, जाणून घ्या.
तृणमूल काँग्रेसचे तब्बल २० लोकसभा खासदार वेगळे होत 'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) पक्षात सामील झाले आहेत.
पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवलेलीच नव्हती. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अवघी ८२२ मते मिळाली होती.
'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना २० जानेवारी २०२३ रोजी झाली.निवडणूक चिन्ह 'पेनची निब' आहे. पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असला तरी त्याला अद्याप मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा मिळालेला नाही.
NCPI ने आपला पहिला राजकीय प्रयोग त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत केला होता. दोन जागांवर निवडणूक लढवण्यात आली.
पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते केवळ ८२२ होती. निवडणुकीनंतर पक्ष जवळपास निष्क्रिय झाला होता.
शेली कुंडू या पक्षाच्या प्रमुख नेत्या असून त्यांचे नाव पक्षाच्या कागदपत्रांमध्ये कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. त्या काही व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशीही संबंधित आहेत.