Rashmi Mane
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.
या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2 हजार रुपये) त्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाते.
या योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.
त्यानंतर 4 महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्याने देशभरातील शेतकरी आता 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
सरकार 20वा हप्ता जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू शकते. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी व भूलेखांचे करून घ्यावे.अन्यथा
अर्ज करताना काही चूक झाली असल्यास ती त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.