Aslam Shanedivan
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील लाखो कुटुंबांना धान्य दिले जाते. जे केंद्र व राज्य सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेतील वितरण व्यवस्थेमार्फत वाटत होते
पण आता या योजनेत (ONORC) 1 एप्रिलपासून मोठा बदल करण्यात येणार असून पोर्टेबिलिटीत रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटविण्यात आले आहेत.
यामुळे लाभार्थी आणि रेशन दुकानदार दोघांनाही दिलासा मिळणार असून लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणे सुलभ होणार आहे.
हा निर्णय झाल्याने पोर्टेबिलिटी व्यवहार वाढणार असून १ एप्रिलपासून मागणीनुसार अतिरिक्त धान्य उपलब्ध होईल. यामुळे दुकानदारांना साठा कमी पडणार नाही.
पोर्टेबिलिटी सुविधेमुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना मोठा फायदा होणार असून दुकान बदलता येणार आहे.
नव्या निर्णयामुळे कोणत्याही राज्यातील किंवा शहरातील रेशन कार्डधारकांना देशातील कोणत्याही अधिकृत रेशन दुकानातून धान्य घेणे सुलभ होणार आहे.
१ एप्रिलपासून अतिरिक्त धान्य कोटा मिळणार असून देशातील कोणत्याही भागात अनुदानित धान्य उपलब्ध होईल.
या निर्णयामुळे विशेषतः बांधकाम, उद्योग आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगार कुटुंबांना याचा थेट फायदा होईल.
Iran war impact on India : इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका! भारतातील ‘या’ उद्योगांचे गणित बिघडले!