Rashmi Mane
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या वोटर अधिकार यात्रेच्या सहाव्या दिवशी भागलपूरमध्ये आहे.
या कार्यक्रमात राहुल गांधींसोबत तेजस्वी यादव आणि वीआयपी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सहनीही उपस्थित राहणार आहेत.
मुंगेरमध्ये मुसळधार पावसातही राहुल गांधींनी जनतेशी संवाद साधत निवडणुकांतील गैरव्यवहारांवर भाष्य केले.
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निकालात हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्रात आयोग व भाजपचे संगनमत सिद्ध झाले आहे. तसेच काही ठिकाणी न दिलेले मतसुद्धा भाजपच्या खात्यात जमा झाले.
राहुल गांधींनी ठामपणे सांगितले की, बिहारमध्ये एकही मत चोरी होऊ देणार नाही. या वेळी त्यांच्या हातात पक्के पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.
जनतेच्या मनाचा आवाज निकालात उमटेल, याची जबाबदारी आम्ही घेऊ” असा विश्वास राहुल गांधींनी लोकांना दिला.
या यात्रेतून राहुल गांधी व सहयोगी पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी “मतदान सुरक्षित करण्याचा” संदेश दिला आहे.