Rajanand More
पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत हे पुरस्कार पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा भेदभाव न करता कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना वगळून सरकारी सेवेत असलेले कर्मचारी पात्र नसतात.
कला, सामाजिक कार्य, राजकारण, सार्वजनिक जीवन, विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा यांसह अध्यात्म, योग, वन्यजीव संरक्षण, पाककला, शेती, नवकल्पना, पुरातत्त्व, वास्तुकला आदी.
साधारणपणे पद्म पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत. परंतु अत्यंत दुर्मिळ आणि काही प्रकरणांमध्ये सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करते.
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी/एनआरआय यांना वगळून १२० पर्यंत असते.
वर्ष २०२७ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज किंवा नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे. स्वतःचे नामांकन (Self-Nomination) देखील करता येते.
केंद्र सरकारने नामांकनासाठी अर्ज मागविले आहे. ता. १५ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाईन नामांकन अर्ज भरता येतील.
अर्जांवर पद्म पुरस्कार समिती निर्णय. पंतप्रधानांकडून दरवर्षी ही समिती स्थापन केली जाते. समितीच्या शिफारशीनंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातात. अंतिम यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होते.
पुरस्कारांसाठी अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावरून करता येतील. अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे.