भारताच्या ‘सुदर्शन चक्र’मुळे पाकिस्तानला भोवळ; पहिल्याच हल्ल्यात दाखवला दरारा

Rajanand More

पाकचा हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानने 7-8 मेच्या रात्री भारतातील 15 लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ड्रोन आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

S-400 | Sarkarnama

हल्ले परतवले

भारताच्या यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे हल्ले परतवून लावल्याची माहिती सरकारने दिली आहे.

S-400 | Sarkarnama

सुदर्शन चक्र

भारतीय लष्कराच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच निकामी करण्यात आली आहेत. या यंत्रणेला सुदर्शन चक्र असेही म्हटले जाते.  

S-400 | Sarkarnama

आधुनिक यंत्रणा

ही यंत्रणा जगातील सध्याची सर्वात आधुनिक यंत्रणा मानली जाते. स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा दावा केला आहे.

S-400 | Sarkarnama

चार प्रकार

एस-400 यंत्रणेचे चार प्रकार असून 40 किमी, 120 किमी, 200 ते 250 किमी आणि सर्वाधिक 400 किमी अंतरापर्यंत मिसाईल निकामी करण्याची क्षमता आहे.

S-400 | Sarkarnama

वेगाला तोड नाही

चारही प्रकारच्या यंत्रणेचा वेग अनुक्रमे ताशी 3185 किमी, 3675 किमी, 7285 किमी आणि 17,287 किमी एवढा प्रचंड आहे.

S-400 | Sarkarnama

बॉम्ब, विमाने निकामी

भारताची एस-400 ही यंत्रणा बी-1, एफबी-111 आणि बी-52 सारखे बॉम्ब निकामी करू शकते. त्याचप्रमाणे वॉरफेअरसारखे विमान अर्ली वॉर्निंग रडार एअरप्लेन, फायटर प्लेन, बॅलेस्टिक मिसाईल आदींनाही टार्गेट करू शकते.

S-400 | Sarkarnama

पहिल्यांदाच वापर

एस-400 ही यंत्रणा भारताने पहिल्यांदाच वापरल्याचे सांगितले जात आहे. भारताने रशियाकडून ही यंत्रणा घेतली आहे.

S-400 | Sarkarnama

NEXT : अमरावती, नागपुरात शेतजमीन..! भावी सरन्यायाधीश भूषण गवईंची संपत्ती किती?

येथे क्लिक करा.