सरकारनामा ब्युरो
पंढरपूरच्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करताना पूर्वी एक दगडी उंबरा होता.
देवळातील गाभाऱ्यात जाण्यासाठी हा दगडी उंबरा ओलांडून जावे लागत असे. या उंबऱ्यामुळे वृद्ध भाविकांना आत-बाहेर जाणे-येणे अवघड होत होते.
अशात 1953 मध्ये भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु पंढरपूरला आले होते.
पंडित नेहरु यांचे वय झाल्याने त्यांनाही हा दगडी उंबरा ओलांडून जाताना त्रास झाला. यांना ठेच लागली आणि चालताना काहीसे अडखळले.
यानंतर मंदिर प्रशासनाने पुरातत्व विभागाशी चर्चा करून हा उंबरा काढून टाकत नवीन उंबरा टाकला.
यामुळे वयस्कर भाविकांनाही सहज गाभाऱ्यात जाता येऊ लागले. आता तसा दगडी उंबरा फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळतो.
हा उंबरा काढण्यामागे काही अपशकून असल्याच्या कथा सांगण्यात येतात, पण त्यामागील हे खरे तर्कशुद्ध कारण असल्याचे सांगितले जाते.