Rashmi Mane
आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांची उपजीविका शेतीतूनच चालते.
वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांची शारीरिक ताकद कमी होते आणि उत्पन्नाचे साधन जवळजवळ संपते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे.
वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 पेन्शन. म्हणजेच दरवर्षी 36,000 ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे तसेच या वयोगटातील सर्व शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
18 वर्षांनी अर्ज केल्यास दरमहा 55 रुपये भरावे लागणार तर 40 वर्षांनी अर्ज केल्यास दरमहा 200 रुपये भरावे लागणार आणि ही रक्कम 60 वर्षांपर्यंत भरावी लागते.
गुंतवणुकी केल्यावर निवृत्तीनंतर शेतकऱ्याला दरमहा खात्रीशीर 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.
शेतकरी पीएम किसान सन्मान निधीतून मिळणारा पैसा या योजनेत गुंतवून भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात.