Rashmi Mane
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2,000 रुपये) थेट खात्यात जमा होतात.
शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 20 हप्ते वितरित झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा 21 व्या हप्त्याकडे लागल्या आहेत.
मागील हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये आला होता. पुढचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. तरीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
कधी कधी तांत्रिक कारणांमुळे किंवा पडताळणी प्रक्रियेतील विलंबामुळे हप्ते उशीरा येतात.
पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.
ऑनलाइन पोर्टलवर किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करा.
चुकीची वैयक्तिक माहिती देणे, आधार क्रमांकात तफावत, बँक खात्याचे चुकीचे तपशील,
तांत्रिक अडचणी यामुळे हप्ता रोखला जाऊ शकतो.