Rashmi Mane
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर भारताने डिजिटल युगात झेप घेतली.
2015 मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाने सरकारी कामकाजापासून ते सामान्य नागरिकांच्या जीवनापर्यंत मोठे बदल घडवले आहेत.
2014 मध्ये भारतात इंटरनेट वापरकर्ते फक्त 25 कोटी होते. आता तब्बल दहा वर्षानंतर 2025 मध्ये हा आकडा 97 कोटींवर पोहोचला आहे.
देशभरात 42 लाख किलोमीटरहून अधिक फायबर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या दहावर्षानंतर ग्रामीण भागही डिजिटल क्रांतीशी जोडला गेला आहे.
भारतामध्ये दर महिन्याला 17 अब्जांहून अधिक व्यवहार UPI द्वारे होतात.
आज अगदी रस्त्याच्या कडेला भाजी विकणारा विक्रेता सुद्धा QR कोडने पैसे स्वीकारतांना दिसतो.
भारताचा UPI फक्त देशापुरता मर्यादित नाही तर सिंगापूर, यूएई, फ्रान्ससह अनेक देशांनी UPI प्रणाली स्वीकारली आहे.
आज दहा वर्षानंतर डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठी पावले टाकली आहेत.