Mangesh Mahale
येत्या वर्षभरात देशातील १ कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी विविध केंद्रे उभारण्याचीही घोषणा केली.
सागरी तेल शोधासाठी ₹८५,००० कोटींची 'समुद्र मंथन' योजना, आणि शेतीसाठी युरिया व DAP वर भरीव अनुदान सुरू ठेवण्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
जागतिक बाजारात टिकण्यासाठी भारताचा एकच मंत्र 'क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी' असला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. २०४७ पर्यंत भारताला 'विकसित राष्ट्र' बनवण्याचा महासंकल्प मांडला.
संरक्षण उत्पादन ४ पटीने वाढले, इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती ७ पटीने वाढ झाली. डिजिटल व्यवहार तब्बल १००% ने वाढले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली.
आजच्या डिजिटल युगात 'चिप' (Chip) अत्यंत महत्त्वाची आहे. भारताने यात आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले असून ३ मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स सुरू झाले आहेत.
पंतप्रधानांनी पुन्हा एकदा 'वोकल फॉर लोकल'चा नारा दिला. भारत आता दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू शकत नाही. प्रत्येक भारतीय आता स्वदेशी उत्पादनांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
२१ व्या शतकातील भारत जुन्या शतकातील कायद्यांच्या भरवशावर चालणार नाही. काळाच्या गरजेनुसार देश चालवण्यासाठी कायदे आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करावेच लागतील.
देशवासीयांना आत्मनिर्भरता, स्वदेशीचा स्वीकार, कायदेशीर सुधारणा आणि २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्यासाठी मोठ्या संकल्पांची साथ देण्याचे आवाहन केले.